शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१३

सलाम


विटेवर विटा रचिल्या त्यांनी
केला भक्कम पाया
रात्रीचा दिवस केला त्यांनी
नसे जिवाला थारा
एकावरी एक आव्हाने झेलली त्यांनी
काढायला निपटून गाळ सारा
थंडी नाही, पाऊस नाही
सगळाच कडक उन्हाळा
मी नाही, तू नाही,
"आम्ही" म्हटले त्यांनी
झुंजार वृत्तीने आपुल्या,
दाविला शत्रुला दरारा
केला आपुला भारत
खरंच महान ज्यांनी
विनम्र होऊन ध्येयपूर्तीसाठी त्यांच्या
झटूया हा एकच, असू दे नारा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा