गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१३

थोडे तरी भान ..

तू असलास की बघ, दुसरं काहीच साधत नाही
फ़क्त तुला पाहत राहायचे, ऐकत राहायचे
आणि तुझ्या वर्षावात न्हावून जायचे!

सगळ्या रखरखी दुनियेला विसरायला 
लावणे तुला कसे जमते ?
तुझा विरहही मग विसरला जातो, 
तू थोड्या दिवसांनी निघून जाणार
ह्याचेही भान ठेवले जात नाही,
किंबहूना राहत नाही!

मला भान न राहणे समजू शकते मी
कारण विरह मला झालेला असतो..
पण तुझे भान हरपून बरसणे ?

एवढे सारे कोंडून ठेवायचेच कशाला?

अधूनमधून फ़िरकत राहिलास तर काय
हरकत आहे?

तुलाही बरे, मलाही ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा