रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

जीवनकाव्य

खड्यात पडलो मी कसा कोणी केव्हा
तेथेच राहणे वा बाहेर येणे निव्वळ माझ्या हाती

कोण म्हणे उशीर झाला वेळ निघून गेला
हा मी आत्ताच उठलो, उभा दिवस माझ्या हाती

 वादळात सापडलो, भरकटलो ही जरासा
फिरुनी थाऱ्यावर येणे उरले फक्त माझ्या हाती

दिवस सरला, घामही विरला
लगडूनी आले क्षण सारे तान्ह्या राती

किती किती कटकटी असाव्यात माझ्या माथी
तत्पर जरी मी सर्वांच्या थोपटवाया पाठी

कसचं काय, काही नाय, वेळ टाळली अधाशी
पदरी पडले पवित्र झाले हा भावच माझ्या साथी

भान हरपले, तल्लीन झाले लागली समाधी
कोणकोण दर्शन देऊन गेले या जीवनकाव्या साठी


-Alvika

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा