आसमन्ती राहा, आठवण ठेऊ!
तुझे दु:ख मोठे करिशी हलके
आम्हा  पामरा नाही, येई सोसू
आली होतीस एकदा, घेऊन सगळे गेलीस
कुणाच्या दारी जाऊन असे नको छळू
करुणा माया सर्व,  जिवंत आम्ही ठेऊ
दुरुनच पहा सर्व मिळून चालू
वचन देतो तुला भावना जपू 
परदु:खी जीवे,  तुझे मोल जाणू
म्हणून  सांगते वेदने, दारीच राहा
डोकावून पहा आम्हा,  सुखी संसारा
नको ती निर्मिती, नको ते सोसणे
आहे ते पुरे आहे, नको ते बोलावणे
माफ़ी मागते तुझी, उजळून गेले जरी
व्र्ण अजून ताजे असती, नको पुन्हा येऊ
नको वेदने, तू....
-अलका काटदरे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा