गुरुवार, ७ मे, २०२०

बांध

बांध घालावा की नाही
ह्या वाहत्या पाण्याला
नाही घातला तर कसेही वाहेल
कुठेही जाईल
वळण घेईल का बरोबर
आटले जरी थोड्या महिन्यांनी
धुऊन काढेल  सर्वांना
एकेक निरसन  करायला हवे

पाण्याला वळण द्यायलाच हवे
पुरापासून वाचायला
नासधूस थांबवायला
बेभान वृत्तीला आवरायल
अविचार थांबवायला
योग्य वेळी योग्य ठिकाणी
थोपवून त्याला  शांत करायलाच हवे

निसर्गाची देणगी मानून घ्यायची
त्याला वाहू द्यायचे स्वच्छंद
आपणही आनंदात नहायचे
जराशी योग्य दिशा देऊन 
सर्वांचे भले बुरे पाहून
पाणी वळवायलाच हवे !!








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा