बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

आवाज


आवाजाची मला जन्मा भीती

हात यायचे दोन्ही कानी

बालपणी नदी किनारी
वैकुंठे  कोणी जाई
वाहत्या झऱ्याचा झुळझुळ मग
त्यातच लुप्त होई !

शाळेला जाता बसचा ब्रेक
गप्पांना  तेव्हाच कसे भरते येई
घसा खरडता औषध घेऊनी
सवय ही मोडीत जशी जाई !

अनोळखी येता कोणी घरी
विनोदावर त्यांच्या अलगद हसू
खुदू खुदु आमचे त्यावेळी
शब्द  घेऊनी दोन बंद  होई !

आली मग आगगाडी नशीबा
धावत गेले नित्य समांतर
त्याच गाडीत बसुनी मग
Ear phone कसा सेवे येई !

संसारात कूकर ची शिट्टी
बाळांची रडणी टीव्ही चालू
फेरीवाले चिंचोळ्या गल्लीत
मिश्रण कसे ते श्रवणीय होई !

गोविंदा गणपती 
येती सारे रस्तोरस्ती
भल्या पहाटे जग झोपूनी
मंदिरी घंटा तशी प्रिय होई !

राहता राहिले ऑफिस सुंदर
सहकारी अन् मैत्रिणी जिवलग
शांतता नांदे एकमेका समजून 
अंतरी आवाज तरी दबून जाई !

निवृत्तीला येता शरीर
मन  करी आक्रोश
आवाज कुठे गेला 
आवाज कुठे गेला !!

अलका काटदरे / १४.८.२०






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा