गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 अमर कोणाला व्हायचे आहे

नक्कीच नाही कोणाला
वर नाही तो असे एक शाप

हिंडून फिरून हसून
मनमुराद जगायचे
वेळ आली की मग
हळूच निघून जायचे

वेळ ज्याची त्याची
प्रत्येकाला उमगे
गात्रे जेव्हा साथ नाकारती
असहाय, परावलंबन 
शब्द जेव्हा मनी येती

धट्टे कट्टे सदा राहायचे
नीट नेटके आचरण ठेवायचे
विचार असतात जरी पक्के
सैल सोडून वागायचे हटके

जमवून घ्यायचे म्हणजे काय
स्वतःशी, दुसऱ्याशी, सार्यांशी
मुरड घालायची थोडी
परंपरेला, रुजलेल्या समजुतींना
सामावून घ्यायचे नव्याला
नव्याने आलेल्या बाल्याला

मरणातून जगायचे
कृतीतून दाखवायचे
जीवन हे मरण नव्हे
मरण हे संकट नव्हे
पेरून ठेवायचे धन
आचारांचे, विचारांचे
मागे ठेवायचे नाव
आपल्या कृती,कार्याचे ! 

12.2.22

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा