गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 काय केले मी काहीच नाही अजुनी

तत्वे पाळली कुणा पटलीच नाही

आग लागली की वणवा म्हणावा
पाणी किती लागले गणतीच नाही

भटकंती झाली मी कळले सर्वांना 
मला कुणी तसे  कळलेच  नाही 

मौन धरुनी का वादळ शांतते
हेलकावे भावनांचे थांबलेच नाही 

रस्तो रस्ती एकच ती  पुराणी चर्चा
समजून उमजून  कुणी  वागलेच नाही

कराया तसे किती तरी सामोरे
येण्याची तारीख त्याने कळवलीच नाही !!

       अलका काटदरे /१६.३.२१



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा