गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 ठरवले होते  कविता नाही लिहायची

सुखाची किंवा दुःखाची ही
कल्पनेला कशा वाट द्या
कुठेही जाऊन आदळली तर
आणि तो मोठा दगड असेल तर !

दगड धुतला जाईल हे खरे आहे
पण पुन्हा धूळ साचेलच ना
भावना काय कल्पना काय
दोघी एकमेकात अडकलेल्या
दगडाशी त्यांचा काय संबंध
आणि दगडाने का लक्ष घाला

राहू दे कल्पनेला शांत उरात
भावना समजून घेऊन क्षणात
दिवस जातील असेच सुखात
फुलून राहील मन उगाच ! 


21.6.21

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा