गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 लोकांची पडलेली असते मला

चिंता कशाला कोण ते माझे

ओळख नाही, देख ही नाही
वाहू कशाला आपुलकीचे ओझे

आता भेटू असे ही नाही
राहू कशाला संवाद करुनी रोजे

वाटे कितीदा मला जरी हे असे
संवेदना जागृत अन् मन करिती ताजे 

वेळ काढती वाचायला मला
भावना हिंदोळे ओळखून माझे

क्षणिक का असेना मला पारखती
मांडते विचार वेळोवेळी जे जे

भाव विश्व माझे समृद्ध करिती
ऋणी आहे त्यांची ते नसू  देत माझे

चिरफाड न करता समजून घेणारे
हलके करणारे  सुख दुःखाचे ओझे 

लोकांची चिंता राहू दे अशीच मना
साहित्य त्यांचे बहरू दे गाऱ्हाणे माझे ! 

       -अलका काटदरे/ २५.७.२३









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा