गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 जवळ पासचे लोक दिसेनासे झाले तसे

होऊ लागली जाणीव  स्व च्या असण्याची 
भरपूर सारे मिळालेले उपभोग घेतलेले
नव्हती आजपर्यंत उणीव जराही कशाची
दिले का आपण कुणा गरजू ला काही
दोन दिवस त्याचे सुखात जायला, ह्याची
मागत नसते कुणी दानत असावी लागते
कुठेतरी परतफेड थोडीतरी, घेतल्याची
देणे हा स्थायी भाव का नये अंगिकारू
लज्जत वाढवाया आपुल्याच जगण्याची ? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा