गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 ही भूक नसती माणसाला

तर किती बरे झाले असते
भुके परी वणवण त्याची
राब राब राबणे टळले असते
बळी तो कान पिळी खरे जरी
भूक बळी वाढत गेले नसते
शिकण्याची भूक वेगळीच असते
आजन्म समाधानी आयुष्य मिळते
भूक भूक करून काही मिळत नसते
कष्ट करून ती भागवायची असते
भूक खूप काही शिकवून जाते
पण असते तेव्हा जाळवत राहते
भुकेला मर्यादेत ठेवणे जरुरी असते
केव्हाही ती रेषा ओलांडू शकते

अन्नाची भूक सर्वानाच
भक्तीचा भुकेला एकच
प्रेमाचे भुके आपण सर्वच
अन्नाने भूक भागते पोटाची
भक्तीने आत्म्याची
प्रेमाने मनाची 
भुके साठी दाही दिशा 
त्रिवार सत्य असते

खरेच, ही भूक नसती 
तर किती बरे झाले असते !

   अलका काटदरे/ २३.२.२०२१












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा