गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 आपल्याला  स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे झाली आणि हे वर्ष आपण अमृत महोत्सवी म्हणून साजरे करत आहोत. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्या वर त्यातील बदल जाणवून घेण्यातच तसेच आपल्या विविध घटना तयार  करण्यात  पाच दहा वर्षे गेली. नंतर ते स्वातंत्र्य आपण अनुभवू लागलो. काही वर्षांनी  स्वातंत्र्य मिळवून देणारी पिढी काळाआड गेली आणि आपण उरलो. ज्या पिढीला फक्त इतिहास रूपाने स्वातंत्र्य संग्राम माहित झाला. 


आपणा सर्वांना सुंदर भारत अपेक्षित आहे. सुजलाम, सफलाम,  विविध भाषांनी नटलेला, अती सुंदर निसर्गाने नटलेला, भारत पूर्वी पासूनच आहे आणि त्यात बदल होणार नाही. 
त्याचे संवर्धन करणे जरुरी आहे आपल्याकडे मनुष्य बळ रुपी प्रचंड ऊर्जा आहे, तिचे योग्य दिशेने उपयोग करून घेतला पाहिजे.  सर्व भाषा, प्रांत एकमेकात मिसळून जाणे अपेक्षित  किंवा शक्य नसले तरी त्या सर्वांनी गुण्या गोविंदाने भारताच्या विकासाकडे पूर्ण झोकून देणे आवश्यक आहे. आपला भारत 75 वर्षी ही विकसनशील आहे, तर तो आता विकसित म्हणून घोषित व्हायला पाहिजे, त्यासाठी आपली सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे. महत्वाचे म्हणजे विविध राजकीय पक्ष हे फक्त हेवे दावे पेक्षा एकत्र येऊन उज्वल भारत कसा अजुन संपन्न होईल असे चित्र तयार झाले पाहिजे. 75 वर्षीय भारत हा सुख समृद्धी बरोबर अतिशय शांतप्रिय झाला पाहिजे. नव नवीन घोषणा होतात त्या प्रत्यक्ष अमलात आणल्या गेल्या पाहिजेत. अजूनही भ्रष्टाचार, अबलांचे शोषण, राजकीय, सामाजिक फूट, गरिबीचे बळी, पर्यावरण rhas होताना दिसत आहे. हे थांबले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक जण आत्म निर्भर राहून प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीचा माणूस म्हणून  आदर ठेवून वागला पाहिजे. आपल्या संस्कृतीचे खऱ्या अर्थाने जतन केले तर हे सहज शक्य आहे.

आजचा वर्तमान हाच पुढें जाऊन इतिहास होणार आहे. त्यामुळे आपण जर भेदभाव न बाळगता सर्वांनी एकजुटीने एकच लक्ष्य ठेवून प्रगती करण्याचे ठरवून वागलो तरच भारताचे हे चित्र साकारले जाईल आणि पुढची पिढी सुद्धा तशीच शिस्तीने वागेल. 
थोडक्यात 75 वर्षांचा भारत अनुभव संपन्न, जगाला शांततेचा आणि सर्वांगीण प्रगतीचा, सर्वार्थाने स्वच्छ  होऊन प्रत्येक भारतीय शांती दूत झाला पाहिजे. 
2.10.21

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा