गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 बदाम खाल्ले असते तर

झाले नसते का मी माठ

मनुका खाल्ल्या असत्या तर
झाले असते का मी सुंदर

सौंदर्य दडले होते  सुविचारात
बुद्धी मोजली गेली होती मार्कात

होते कोठे एवढे अगाध ज्ञान
आज्ञा पाळून अभ्यास हे एकच ध्यान

माणूस जोडणे व्यवहार ज्ञान
हेच होते सुखी आयुष्याचे दान

माठातल्या पाण्याला गोडी होती
लांब शेपट्याची थोरवी होती

व्यवहार दिसत होताच सर्वत्र
कलह औषधाला ही नव्हता मात्र

बदाम आता खाते रोज चार
मनुकाही विचार न करता सारासार

बुद्धी होती ती आणि आताची
सौंदर्य होते ते आणि आताचे

करता येईल का दोहोंचे माप ! 
@ अलका काटदरे/२२.३.२२










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा