गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 त्याला भेटण्याची नसे कुणा आस

खबरदारी घेतात,  तो येऊ नये म्हणून पास

भेटायचंच आहे तर सुस्थितीत भेटावे ही इच्छा

त्यासाठी भले लोक मार्ग स्वीकारतात सच्चा

म्हणून मला वाटते, प्रत्येकाने-

एकदातरी त्याचे ओझरते दर्शन घ्यावे

एकदा तरी त्याला स्पर्श करून यावे

त्याच्या दरवाज्यात झाकल्यामुळे

तेथे जाणे किती सोपे आहे हे कळते

आपण त्याच्यापासून दूर नाही तसे

तो ही आपल्या सामोरे आहे, हे ही लक्षात येते

आयुष्याचा अर्थ तेव्हाच गवसतो

मनातील मनोरे व्यर्थ ठरतात

कार्य रथाचा पट समोर उभा ठाकतो

गात्रे पटापट कामाला लागतात

दिल्या घेतल्याचा हिशेब चालू होतो

आपण कुणाचे देणे नाही ना,

खात्री करू लागतो..

म्हणून म्हणते हे ओझरते दर्शन

खरेच चांगले असते -

कारण -

त्याच्याशी झालेल्या झटापटी नंतर

मनाची पूर्वतयारी होते

अनुभव गाठीशी राहतो

त्याने surprise visit दिली तर

आपण न डगमगता त्याला सामोरे जातो

आणि मनाची समजूत घालतो -

श्रेय हे सर्व विधात्याचेच  आहे

त्याने मात्र हे सर्व घेणे आहे

माझे माझे म्हणणे सर्व फोल आहे

त्याच्यात विलीन झाल्यावर

उरणार फक्त नाव आहे

नावाला उपाधी कोणती द्यायची

हे उर्वरित जनता ठरवणार आहे !!

- अलका काटदरे / मकस 20.4.20

(प्रसव date February 2007)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा